"‘उद्धवराज’ची तयारी: मराठी अस्मितेसाठी नवे शक्तिसमीकरण?"

 'उद्धवराज' एकत्र येण्याची शक्यता: महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे समीकरण?



उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी चेहरे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर दोघांनी स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व राखले, तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मात्र सध्या दोघांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत.



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या "वेळ आली आहे एकत्र येण्याची" या संदेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघांचे पुन्हा एकत्र येणे म्हणजे फक्त एक कौटुंबिक मिलाफ नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडवणारी घटना ठरू शकते. कारण उद्धव आणि राज, दोघांनाही मराठी अस्मिता, हिंदुत्व, आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा समानरीत्या भावतो.

राज ठाकरे यांचे भाषणशैलीतील आक्रमकपणा आणि उद्धव ठाकरे यांचा संघटन कौशल्य यांचा संगम झाल्यास, मराठी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकते. तसेच भाजप आणि महाविकास आघाडीच्या राजकीय गणितांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मात्र, हे एकत्रीकरण किती टप्प्यांवर शक्य आहे, दोन्ही नेत्यांच्या अहंभावावर मात होऊ शकते का, आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या दोन दशकांत निर्माण झालेली तुटलेली भावना लगेच भरून निघेल का, हा मोठा प्रश्न आहे.सध्या तरी 'उद्धवराज' एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा उत्साह आणि अनिश्चितता दोन्ही पेरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post