पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई : पाकिस्तानला दणका
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेत कठोर पावले उचलली आहेत. या हल्ल्यात जवानांना व सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने तातडीने बैठका घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले.
सर्वात मोठा निर्णय म्हणजे आजपासून अटारी-वाघा सीमेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात जाणे-येणे पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यामुळे देशात असलेल्या पाक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सिंधू जलकरारही तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत भारत पाकिस्तानला सिंधू नदीचे पाणी देत असे, मात्र आता तो पाण्याचा पुरवठा रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सर्व पावले ही पाकिस्तानला जागेवर आणण्यासाठी आणि भारताच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. देशवासींनी या निर्णयांचे स्वागत करत सरकारच्या कठोर पावल्यांना पाठिंबा दर्शवला आहे. पहलगाम हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारत आणखीही कडक निर्णय घेऊ शकतो, असे संकेतही मिळत आहेत. आता सर्वांचे लक्ष आहे की पाकिस्तान या कारवायांनंतर काय प्रतिक्रिया देतो.