मुरली सहस्त्रकुंड तांडा येथे भिषण पाणी टंचाई स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष .

 मुरली सहस्त्रकुंड तांडा येथे भिषण पाणी टंचाई स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष .



मुरली प्रतीनिधी ( नितीन जाधव)

उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या बंदी भागातील मुरली सहस्रकुंड तांडा येथे पाण्याची तीव्र टंचाई चालू असून स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे . त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून येथे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील गावकऱ्यांकडून होत आहे .

यवतमाळ जिल्ह्यात मुरली सहस्त्रकुंड तांडा , नकाशातच नसून या तांड्याकडे स्वतंत्र झाल्यापासूनच शासनाचे लक्ष नाही शासनाच्या निधीचेया गावकऱ्यांना गंध सुद्धा गावकऱ्यांना मिळाले नाही गेल्या 75 वर्षांमध्ये या गावातल्या लोकांना एकही बेघर घरकुल मिळाले नाही हे गावकरी दरवर्षी पैनगंगेच्या पाण्याच्या भरोशावर आपले मुके जनावरसह व मानवास पिण्यास लागणारे पाणी उपलब्ध होते . परंतु पैनगंगा नदी कोरडी ठाक पडल्याने या गावकऱ्यांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे .

एक भांड भरण्यासाठी तासन तास एका विहिरीत बसून वाटीच्या मदतीने भांडी भरून घ्यावे लागत असल्याचे चित्र सध्या या परिसरात पाहण्यास मिळत आहे ,तरी संबंधित अधिकाऱ्याने येथे तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत असून पाणी उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले ,

Post a Comment

Previous Post Next Post